‘निसान’ भारत सोडणार नाही   

नवी दिल्ली : जपानची आघाडीची मोटार निर्मिती कंपनी निसान भारत सोडणार नाही. कंपनीच्या मोटारींचे उत्पादन भविष्यातही देशात सुरू राहणार असल्याचे बुधवारी स्पष्ट करण्यात आले. 
 
निसान कंपनी भारतातून गाशा गुंडाळणार असल्याचे वृत्त पसरले होते. त्याचे खंडन कंपनीचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्स यांनी काल केले. ते म्हणाले, नवीन दोन मोटारींसह कंपनीचा विस्तार देशात केला जाणार आहे. त्या अंतर्गत २० वितरक नेमले जातील.  या आर्थिक वर्षांत देशांतर्गत वितरणासाठी आणि निर्यातीसाठी प्रत्येकी एक लाखांवर वाहनांच्या निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. दरम्यान, ३१ मार्च रोजी रेनॉल्ट कंपनीने निसान कंपनीचे ५१ टक्के समभाग खरेदी करण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे निसान देशाबाहेर जाणार असल्याचे मानले जात होते. 
 

सीएनजी किट उपलब्ध

 
निसान कंपनीच्या मॅगनाइट मोटारीला सरकार मान्य सीएनजी किट बसविण्याची योजना आखली आहे. त्यासाठी ग्राहकांना अतिरिक्त ७४ हजार ९९९ रुपये मोजावे लागतील.

Related Articles